ऑनलाईन टीम / बिहार :
बिहार मधील सर्व मजुरांच्या तिकिटाचा खर्च बिहार सरकार करणार अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. लॉक डाऊनमुळे रोजगार नसल्याने परराज्यात अडकलेल्या मजूरांना त्याच्या घरी परत जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या मजूर व कामगारांना घरी जाण्यासाठी विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. या मजुरांच्या तिकिटांचा खर्च कोण करणार यावर चर्चा चालू असताना बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारच्या मजुरांसाठी खास घोषणा केली आहे.
नितीश कुमार म्हणाले, देशातील विविध राज्यात अडकलेल्या बिहार मधील मजुरांचा खर्च बिहार सरकार कडून करण्यात येईल. तसेच या मजुरांना तिकीटा व्यतिरिक्त अजून 500 रुपये खर्चासाठी दिले जाणार आहेत, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.