ऑनलाईन टीम / तरुण भारत
गोव्याच्या निवडूकीत प्रभारी म्हणुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली असुन ते अभिनंदनास पात्र असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाचं नागपुरात भाजपाच्यावतीने सेलिब्रेशन करण्यात आलं यावेळी बोलत होते. या कार्यक्रमात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गडकरी म्हणाले कि, “पाच राज्यांमध्ये झालेल्या या महत्वाच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपला नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या नेतृत्वात अभुतपूर्व यश मिळालं असून पक्षाचा आत्मविश्वास वाढवणारं आहे,” असं गडकरी म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले की, “अनेकजण पाच राज्यांमध्ये निवडणुका कठीण असल्याचं बोलत होते. खासकरुन गोव्याच्या बाबतीतही बोललं जात होतं.
अनुकूल स्थितीत असतानाही आपल्याला इतक्या जागा मिळाल्या नाहीत. पर्रीकर असतानाही आम्हाला इतराचं समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पण यावेळी गोव्याच्या जनतेने भाजपाला पूर्ण बहुमत दिलं. त्यामुळे गोव्याच्या जनतेचे आभार मानावे तितके कमी असल्याचं ही ते यावेळी बोतलताना म्हणाले. यामुळे भाजप पक्षाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल असं ही ते यावेऴी म्हणाले. यावेळी गडकरींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधत म्हटले कि, गोव्याच्या जनेतेमध्ये इतर पक्षांना त्यांच काय स्थान आहे हे ही दाखवल्याचं म्हणत गडकरींनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला ही कोपर खळी घातली आहे.