प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील निवेंडी (वरची) बौद्धवाडी येथे पहिल्याच पावसामध्ये नदीवर पूल खचल्याचे निदर्शनास आले आह़े या पूलावरून एसटीसह अन्य प्रवासी वाहतूक होते. पावसाळ्यात हा पूल वाहतूकीस अयोग्य झाल्यास अनेक वाडय़ांचा संपर्क तुटण्याची किंवा मोठा अनर्थ घडण्याची भिती वर्तवली जात आह़े
पूर्ण प्राथमिक शाळा निवेंडी येथील नदीवर हा पूल आह़े या पूलावरून बौद्धवाडी, वारपटवाडी, देवपाटवाडी याठिकाणचे रहिवासी ये-जा करीत असतात़ बौद्धवाडीकडे जाणारी एसटी बसदेखील याच पूलावरून जाते. दरम्यान पहिल्याच पावसात हा पूल खचला आह़े नदीचे पाणी वाढल्यानंतर वाहतूकीसाठी हा पूल धोकादायक अवस्थेत पोहचत़ो त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े
जिल्हा परिषद,पंचायत समिते, सार्वजनिक बांधकाम विभाग व सर्व संबंधित विभागांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून या पुलाची दुरूस्ती करावी अथवा नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ उमेश कदम, जितेश कदम, विवेक कदम यांनी केली आह़े