ऑनलाईन टीम / जयपूर :
नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरातून विरोध होत असतानाच पाकिस्तातून भारतात आलेल्या हिंदू शरणार्थींना राजस्थान सरकारने सवलतीच्या दरात जमीन देण्यास सुरूवात केली आहे.
राजस्थानमध्ये एक लाखापेक्षा अधिक हिंदू शरणार्थी आले आहेत. त्यांना भारतात वास्तव्य करता यावे, यासाठी अशोक गेहलोत सरकारने जमीन उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या सरकारने आतापर्यंत 100 हिंदू कुटुंबांना 50 टक्के सवलतीच्या दरात जमिनी देऊ केल्या आहेत. त्याबाबतची कागदपत्रेही वितरीत करण्यात आली आहेत.
गेहलोत सरकारच्या या मोहिमेपासून काँग्रेस नेत्यांनी दूर राहणे पसंत केले आहे. जयपूरमध्येही आतापर्यंत 5 हिंदू शरणार्थी कुटुंबांना जमीन वितरीत करण्यात आली आहे.