बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण कन्नड जिल्ह्याती बेलथांगडी तालुक्यातील उजीरे येथे ३० डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली आहे. पण पोलिसांनी निष्पाप लोकांना अटक केली असल्याचा आरोप सोशल सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एसडीपीआय) शुक्रवारी केला.
एसडीपीआयचे राज्य सचिव अशरफ मचार यांनी पत्रकारांशी बोलताना मध्यरात्री तीन पक्ष कार्यकर्त्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर पाकिस्तान समर्थक घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. त्यांनी दावा केला की एसडीपीआय सदस्य पाकिस्तानच्या बाजूने नव्हे तर पक्ष समर्थक घोषणा देत होते. ते म्हणाले, फक्त भाजप आणि संघ परिवारातील नेते नेहमीच किस्तानबद्दल बोलतात.
मुस्लिम समुदायाचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर पोलिसांनी एसडीपीआयच्या १५ कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. खासगी वाहिनीच्या मदतीने जातीयवादी मानसिकता असणार्या काही लोकांनी व्हिडिओवर डॉक्टोरिंग केल्याचा आरोप मचार यांनी केला.