प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरातील अगोदरच गतवर्षी कोरोनामुळे हैराण झालेले आहेत. त्यातच पालिका कर माफ करणार अशी हुल उठली होती. परंतु प्रक्रिया सुरु असल्याने नक्की कर भरायचा की माफ होणार याकडे सगळय़ांच्या नजरा आहेत. असे असतानाच थकबाकी वाढू लागली आहे. मार्च महिन्यात दरवर्षी पालिकेचे टार्गेट पूर्ण होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून सातारा पालिकेचे टार्गेट पूर्ण होवू शकले नाही. 44 कोटी 86 लाखाचे उद्दिष्ट होत. त्यापैकी केवळ 12 कोटी 8 लाख 64 हजार एवढे वसुल झाले असून अजून 33 कोटी वसुली करायची आहे. त्याकरता पालिकेचे एकच पथक फिरते आहे. त्या पथकाकडून उद्या थेट जप्तीच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.
मुख्याधिकारी अभिजीत बापट हे चांगले अधिकारी आहेत. प्रत्येक बाबतीत त्यांचे सकारात्मक निर्णय असतात. वसुलीच्या मोहिमेमध्येही ते कुठे कमी पडत नाहीत. त्यांच्याकडून योग्य नियोजन असते. यावर्षी कोरोनामुळे मात्र सर्वच हतबल झालेले आहेत. तरीही पालिकेच्या वसुलीकरता मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पथक नेमून त्या पथकास सूचना दिलेल्या आहेत. त्या पथकाने पालिकेतच मोठे थकबाकीदार आहेत, छोटे थकबाकीदार कोण आहेत त्याची यादी काढली आहे. असे तब्बल 124 जण आहेत. त्या सर्वच थकबाकीदारांना वॉरट बजावले आहेत. तसेच इतरांना घरोघरी जावून पैसे भरा, अशी हात जोडून पथक विनंती करत होते. आता मात्र, मंगळवारपासून पालिकेचे हेच पथक ऍक्टीव्ह मोडमध्ये काम करणार आहे. तशा सूचना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिल्या आहेत. त्यामुळे बडय़ा धेंडांनाही सुट्टी दिली जाणार नाही. ज्यांची थकबाकी आहे त्यांच्या मागे वसुलीचा तगादा हा लागणार आहे.
नेत्यांच्याकडे थकबाकीदारांची विनंवणी
सातारा पालिकेच्या पदाधिकाऱयांना भेटून आलेले बील तेवढे कमी करा, अशी विनंती काही नागरिक करु लागले आहेत. परंतु पालिकेतील नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांच्यासह सर्वच पदाधिकारी हे थकबाकीदारांना आलेले बील तेवढे भरा असाच सल्ला देत आहेत.
बापट साहेबांनी दिल्या सूचना
वसुली पथक उद्यापासून आक्रमक होणार असून त्यामुळे पथकावर दबाव येणार आहे. पथकावर दबाव आला तरीही वसुली थांबवायची नाही. कोणत्याही गटाचा असो वा कोणत्याही नेत्याचे नाव घेवू द्या, वसुली ही करायचीच अशा सुचना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे पालिकेचे वसुली पथक चांगलेच सक्रीय झाले आहे.