बटाटा उत्पादनात कमालीची घट : शेतकरी अडचणीत
बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा बटाटा व रताळी काढणीकडे वळला आहे. तालुक्मयाच्या पश्चिम भागातील शेतकरी बटाटा, रताळी काढणीत पुन्हा मग्न झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील आठवडय़ात अधून-मधून पावसामुळे बटाटा व रताळी काढणीत व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा बळीराजा शेतीकामात गुंतला आहे. आता उर्वरित बटाटा पिकांच्या काढणीला सुरुवात झाली असली तरी उत्पादनात कमालीची घट झाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी तातडीने पाहणी करून शेतकऱयांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्मयातील काही भागातील बटाटा पिकाला उगविण्याआधीच तर काही भागात अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे. उर्वरित बटाटा पीक काढून शेतकरी ज्वारीची पेरणी करताना दिसत आहेत. गुरुवारी तालुक्मयातील बहुतांश शिवारात बटाटय़ाची काढणी करून ज्वारीची पेरणी करताना शेतकरी दिसत आहेत.
तालुक्यातील बसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, कल्लेहोळ, बेळगुंदी, बेळवट्टी, सोनोली, बाकनूर, बडस, बस्तवाड, हलगा, कोंडूसकोप, खमकारहट्टी, कोळीकोप्प यासह हंदिगनूर परिसरातील कडोली, केदनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, बोडकेनट्टी, मण्णिकेरी आदी भागात मोठय़ा प्रमाणात बटाटा लागवड करण्यात आली आहे. मात्र बहुतांश भागात खरीप हंगामातील बटाटा बियाणे उगविण्याआधीच जमिनीत कुजून खराब झाले होते. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, काही भागातील बटाटा पिकाची कृषी अधिकाऱयांनी पाहणी केली. मात्र अद्याप बटाटा उत्पादक भरपाईपासून वंचित आहेत.
विशेषकरून लाल जमिनीसह माळरानावरील काळय़ा जमिनीत बटाटय़ाची अधिक प्रमाणात लागवड केली जाते. यंदा तालुक्मयातील बटाटा उत्पादक संकटात सापडले आहेत. याबरोबरच गेल्या दोन-चार वर्षात बटाटा उत्पादकांना फटका बसत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बटाटा लागवडीसाठी शेतकऱयांनी पलटी मारणे, शेणखत घालणे, रासायनिक खते, मजुरी, मशागत यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंवतणूक केली आहे. मात्र गुंतवणूक केलेली रक्कम बटाटा उत्पादनातून निघत नसल्याची खंतही शेतकऱयांनी व्यक्त केली आहे.
गतवषी अतिपावसामुळे बटाटा उत्पादकांना मोठा फटका बसला होता. परिणामी बटाटा पीक कुजून मोठे नुकसान झाले होते. यंदादेखील बटाटा पिकाला मोठा फटका बसल्याने बटाटा उत्पादक संकटात सापडले आहेत. यंदा गतवषीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून उत्पादकांना फटका बसला आहे. दोन वर्षात बटाटा उत्पादक शेतकऱयांकडे दुर्लक्ष झाले असून शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. शासनाकडून बटाटा शिवाराची जीपीआरएसद्वारे पाहणी करण्यात आली. मात्र, अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे केवळ पाहणी करून चालणार नाही तर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत.