बळीराजाची नजर आभाळाकडे, पिके धोक्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांची नजर आभाळाकडे लागली आहे. जून महिना निम्मा संपला तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. कृषी खात्याने जिल्हय़ात 7.53 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले असले तरी अद्याप केवळ 57 टक्के पेरण्या झाल्या आहेत. परिणामी पावसाअभावी पेरणी झालेली पिकेही धोक्मयात आली आहेत.
खरीप हंगामात भात, भूईमूग, सोयाबीन, तंबाखू, सूर्यफूल आदींची पेरणी केली जाते. मात्र यंदा जूनचा पंधरवडा संपला तरी अद्याप मान्सून बरसला नाही. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा उन्हाळय़ात अधिक पाऊस झाला होता. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र मान्सूनच्या तोंडावर पावसाने दडी मारल्याने पेरणी हंगामावर चिंतेचे सावट पसरले आहे.
गतवषी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्या वेळेत पूर्ण झाल्या होत्या. मात्र यंदा मान्सूनपूर्व पाऊस झाला असला तरी मान्सून अद्याप बरसला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. शिवाय पेरलेली पिके देखील कोमेजू लागली आहेत. पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱयांसमोर संकट निर्माण झाले आहे..