देशभरातील पावसाची परिस्थिती पाहता यंदाच्या वषी चांगले पीक उत्पादन येईल, मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे. मात्र कोरोनाच्या या काळात उद्योग आणि सेवा क्षेत्रात कमालीचे नैराश्य आहे. अशा स्थितीत चांगले पिकले तरी तो विकत घेणारा वर्ग समाजात असेल काय अशी शंका इंडियन एक्सप्रेसचे ज्ये÷ पत्रकार हरिश दामोदरन यांनी एका विशेष वृत्ताद्वारे व्यक्त केली आहे. त्याचवेळेला बीबीसीने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या हवाल्याने प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तामध्ये जगभरात प्रचंड मोठय़ा संख्येने नोकऱया जात असल्याचे आणि कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर 48 कोटी लोकांच्या नोकऱया जातील असा अंदाज वर्तवला आहे. भारताचा स्वतंत्र आकडा उपलब्ध नसला तरी दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश मिळून साडेतेरा कोटी लोकांच्या नोकऱया जाण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. हा आकडा भीतीदायक असलातरी त्यातून आजच्या वास्तवाचे आणि भविष्यातील संकटाचे दिशादर्शन होते. लॉकडाऊनच्या काळात आफत ओढवली नाही असे एकही क्षेत्र राहिलेले नाही. वैतागलेला कामगार वर्ग हताशपणे जेव्हा गावाकडे परतला तेव्हा काळय़ा मातीत राबण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नव्हता. मोठय़ा शहरातील बाजारपेठा बंद पडल्यामुळे शेत माल बाजारापर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी उभ्या पिकावर ट्रक्टर फिरवण्याची किंवा जनावरे चरवण्याची वेळ आली. मात्र तरीही शेती क्षेत्राने जिद्द सोडली नाही. आता सर्वत्र झालेला चांगला पाऊस चांगल्या पिकाची भेट देशाला देईल अशी आशा पल्लवित झाली आहे. अशावेळी लोकांची खरेदीची क्षमता संपून जाईल असे मानायला कोणाचेही मन धजावणार नाही. किमान जगण्याइतपत कमवण्याची सक्षमता या देशातील सर्वसामान्य माणूस आजही बाळगून आहे आणि त्याच्याच जीवावर 2001 ते 2008 सालादरम्यानची जागतिक महामंदीदेखील या देशाने परतवून लावलेली आहे. मात्र शास्त्रीय अंदाज केवळ वास्तवाचे चित्रण आपल्यासमोर ठेवत असतात, आव्हानाला तोंड द्यायची तयारी करण्यासही उसंत देतात. जगभरातील काही मोठय़ा कंपन्यांनी आपण लोकांना नोकरीवरून कमी करणार नाही किंवा नव्या नोकऱया देऊ अशी आशा निर्माण केली आहे, ती महत्त्वाचीच आहे. कृषिप्रधान भारताची शेती त्यात राबणाऱयाला पोटभर देऊ शकत नाही. म्हणूनच लोकांचे शहरांकडे स्थलांतर होते. देशातील अनेक टापुंमध्ये प्रयत्नपूर्वक छोटे-मोठे उद्योग उभे राहिले आणि लाखो लोकांना रोजगार मिळाला. हे उद्योग कोरोना संकटानंतर जेव्हा पुन्हा सुरू होतील तेव्हा किती क्षमतेने नोकऱया उपलब्ध होतात आणि बाजारात कशी मागणी येते यावर भविष्यकाळ अवलंबून आहे. अशावेळी कोरोनावर प्रभावी लस उपलब्ध असणे आणि त्यातून जगाची अनिश्चितता दूर होणे हा एक प्रमुख मार्ग उरतो. ही लस म्हणजे केवळ माणसाच्या आरोग्यावर नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या आरोग्यावरही परिणाम करणारी ठरणार आहे. ’खेडय़ाकडे चला’ हा संदेश आजच्या घडीला सर्वच कामगार आणि कारागिरांना जगवेल अशी स्थिती नाही. 80 कोटी जनतेला सरकारने मोफत धान्य पुरवठा करून गेले चार महिने किमान जगण्याची सोय केली आहे. दिवाळीपर्यंत त्यास मुदतवाढ दिली आहे. दिवाळीनंतर जेव्हा नवे पीक येईल तेव्हा सरकारला आपली गोदामे पुन्हा एकदा भरून घ्यायची आहेत. त्यामुळे भरघोस पिकलेले बाजारात विकायला जरी फारशी संधी आज वाटत नसली तरी केंद्र सरकारच्या रूपाने शेतकऱयाला एक चांगला खरेदीदार मिळणार आहे. त्यामुळे देशाच्या अन्नधान्याची गरज भागविली जाऊन लोकांना किमान जगण्यासाठीची धान्य पुरवठा योजना सरकारला पुढील काळासाठी सुद्धा चालू ठेवता येणे शक्मय होणार आहे, हा एक त्यातल्या त्यात दिलासा आहे. 1980 सालानंतर प्रथमच देशाचा आर्थिक विकास दर हा उणे नोंदविला जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. 31 ऑगस्टला जेव्हा आर्थिक विकास दराची आकडेवारी जाहीर होईल तेव्हा देशाचा खरा अंदाज येण्यास मदत होईल. मात्र त्याची लक्षणे तर संपूर्ण देशाला आजही जाणवत आहेत. बाजाराची भविष्याची स्थिती लक्षात येत नसल्याने कोणते क्षेत्र सुरू करावे आणि कुठले उत्पादन वाढवावे याबाबत उद्योजकांमध्येही गोंधळ आहे. त्यात सरकारचे धरसोड वृत्तीचे धोरण, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये नसलेला समन्वय, गोंधळलेली नोकरशाही यामुळे प्रभावी निर्णयांची कमतरता भासत आहे. जर प्रभावी लस हाती आली तर जागतिक महामंदीच्या संकटावरही मात होणार आहे. देशात अनेक क्षेत्रे खुली होऊ शकतात. आजही अन्नधान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादन क्षेत्राला मागणी आहेच. फार मोठय़ा वर्गाकडे आजही पैसा आहे. मात्र तो बाजारात उतरत नाही, कारण त्यांचे जीवन अनिश्चिततेच्या भोवऱयात आहे. या वर्गाला जगातील सर्वच राष्ट्रांच्या प्रमुखांनी दिलासा देऊन खर्च करायची आश्वासक परिस्थिती निर्माण केली पाहिजे. कोरोनाच्या भीतीला बाजूला सारून जसे उद्योग सुरू करायचा निर्णय घेण्यात आला तसेच उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठीचा एक फॉर्मुला शोधावा लागणार आहे. आज बांधकामसह अनेक क्षेत्रात फार मोठी मागणी नसली तरीही जिथे आहे तिथे आवश्यक मालाचा पुरवठा होत नाही, अशीही तक्रार आहे. अशी क्षेत्रे शोधून तेथे मागणी आणि पुरवठय़ाचे सत्र चालू झाले तर काही प्रमाणात आजच्या स्थितीतून वाट सापडू शकते. पिकलेले विकायचे असेल तर अशी क्षेत्रे शोधायला पर्याय नाही. ही क्षेत्रे शोधली तरच उद्याची आशा निर्माण होईल. ही क्षेत्रे म्हणजे किमान प्रतिबंधात्मक उपाय ठरतील. आज कोरोनावर औषध नसताना रोगप्रतिकारक औषधांवर जीव वाचवला जात आहे तशीच प्रतिकारक क्षेत्रे शोधणे हेही आव्हान आहे. अर्थक्षेत्रतील तज्ञांनीच ती शोधली पाहिजेत, तरच तग धरता येईल.
Previous Articleबिरबल आणि ओ हेन्री
Next Article युवासेनेची बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.