ढगाळ वातावरण, उष्म्यात वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. अचानकपणे जोरदार पाऊस पडत आहे. बऱयाचवेळा या पावसामुळे पाणीच पाणी होत आहे. तर या पावसामुळे पिकांनाही फटका बसू लागला आहे. पाऊस नको म्हणण्याची वेळ आली असताना पावसाचे आगमन दररोज होतच आहे. सोमवारीही दुपारी पावसाचा जोरदार शिडकावा झाला. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काहीसे जनजीवन विस्कळीत झाले होते.
यावषी सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने आतापर्यंत चांगली साथ दिली होती. त्यामुळे सर्वच पिके बरी होती. मात्र आता या पिकांच्या काढणीला तसेच कापणीला सुरुवात होताना पुन्हा पाऊस येत आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेली ही पिके वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. सध्या शेतकरी सोयाबिन, भुईमूग, बटाटा ही पिके काढत आहेत. सोयाबिनला हा पाऊस अत्यंत मारक आहे. कारण काढल्यानंतर सोयाबिनवर पाऊस पडला तर त्याची किंमत शुन्य होते. तेंव्हा शेतकरी या परतीच्या पावसामुळे हतबल झाला आहे.
भुईमूग देखील शेतकरी काढत असून त्यामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. याचबरोबर शेतकऱयांची धावपळ उडत आहे. यावषी बटाटय़ाचे उत्पादन अत्यंत कमी झाले आहे. काही प्रमाणात मिळत असलेले उत्पादनही या पावसामुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतकऱयांना शेतीच नको म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे. आता काही दिवसांत भाताच्या कापणीलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाऊस जाण्याचीच प्रतिक्षा सारेजण पाहत आहेत.