मुख्यमंत्री डॉ.सावंत यांचे आवाहन, सांखळीत जलजीवन मिशनचा शुभारंभ
सांखळी/ प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक व्यक्तीने पाण्याची नासाडी टाळून पाण्याचा योग्य वापर व प्रक्रिया करून पुन्हा पाणी वापरण्यासाठी कार्यरत राहावे तसेच शुद्ध पाण्याची नासाडी न करता पाण्याचे महत्व ओळखून ते वाचवण्यासाठी प्रत्येक पंच, नगरसेवक व इतर घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे केले.
जल जीवन मिशन अंतर्गत पंचायत मंडळाने पाण्याची शुध्दता तपसणारे किट वितरित करण्यात आले. या वेळी विशेष जागृती वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. गोवा राज्य हे देशातील पहिले राज्य जे प्रत्येक घराला नळातून शुद्ध पाणी पुरवीत असून सरकार जनतेला शुद्ध पाणी देण्यासाठी सर्व ती जबाबदारी घेते. त्यामुळे शुद्ध पाण्याचा चुकीचा वापर करू नका, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
पाण्याचे महत्व ओळखा
स्वयंपूर्ण गोवा प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वानी विविध योजनांचा चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे डॉ सावंत यांनी सांगितले. सरपंच पंच नगरसेवक यांनी घरोघरी जागृती करावी सरकारचीच जबाबदारी ण समजता समाजातील प्रत्येक घटकाने जागृती करावी सरकार सर्व ते सहकार्य व मदत करून राज्यातील जनतेला सर्व सुविधा देण्यास कार्यरत आहे असे डॉ सावंत यांनी सांगितले
मंत्री दीपक पाऊसकर यांनी गोवा जल जीवन मिशन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना प्रत्येकाला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी कार्यरतआहे. बाराही तालुक्मयातील घरोघरी शुद्ध पाणी पुरवले जात असून बिल भरण्यासाठी ऑटियस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उत्तम पार्सेकर, संतोष म्हपणे, गोपाळ सुर्लकर,महेश सावंत प्रदीप रेवोडकर श्रीकांत पेडणेकर आदी उपस्थित होते. उत्तम पार्सेकर यांनी स्वागत करून योजनेची माहिती दिली. राज वैद्य यांनी मार्गदर्शन केले. तालुक्मयातील विविध सरपंच पंच उपस्थित होते. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन तर संतोष म्हापणे यांनी आभार मानले.