सावंतवाडी / प्रतिनिधी:
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने अंतर्गत फक्त वर्षाला बारा रुपये भरल्यावर तब्बल दोन लाख रुपये विमा रक्कम प्राप्त झाली आहे .सांगेली येथील विद्या विजय शेडगे या महिलेचा पती 31 डिसेंबर 2020 रोजी आकस्मित निधन झाले होते त्यानुसार विमा कंपनी च्या माध्यमातून सांगेली येथील जिल्हा बँकेच्या शाखे तर्फे दोन लाख रुपये देण्यात आले आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांना शेतकरी यांच्यासाठी केंद्रशासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना वर्षभरापूर्वी कार्यान्वित केली आहे या विमा योजनेत फक्त वर्षाला व्यक्तीने बारा रुपये बँकेत भरायचे आहेत त्यानंतर त्या व्यक्तीला काही झाल्यास व त्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला विमा रक्कम देण्याची तरतूद केंद्र सरकारचे आहे त्यानुसार आता केंद्र सरकारच्या योजनेचे लाभ गोरगरिबांना मिळत आहे सांगली येथील जिल्हा बँकेचे शाखाधिकारी डी बोडके व शंकर राऊळ आदिने विमा रक्कम प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले