बेळगाव / प्रतिनिधी :
लॉकडामुळे साधारण दोन महिने बंद असलेल्या बससेवेला 19 मे पासून सुरूवात करण्यात आली. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद फार कमी होता त्यामुळे परिवहनला मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र गेल्या आठदिवसांपासून प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस किंचित वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिवहनला दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता वाढविण्यात आल्यानंतर राज्यांतर्गत बस बससेवा सुरू झाली. दरम्यान प्रवाशांचा प्रतिसाद थंडाच होता. त्यामुळे परिवहनला दररोज लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागत होता. दरम्यान बसचालक, बसवाहकांना प्रवाशांच्या प्रतीक्षेत बसावे लागत होते. मात्र आता प्रवाशांच्या संख्येत थोडी थोडी वाढ होताना दिसून येत असल्याने परिवहनच्या चाकांना गती मिळाली आहे. निपाणी, चिकोडी, धारवाड, बैलहोंगल, हुबळी, गोकाक आदी ठिकाणी प्रवाशांच्या संख्येत समाधानकारक वाढ होत असली तरी स्थानिक प्रवाशांचा अद्याप थंडाच प्रतिसाद आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली असून स्थानिक प्रवाशांबरोबर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरासह ग्रामीण भागात बस धावत असून प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱया वाढविण्यात येत आहेत. मात्र अद्यापही प्रवाशांच्या मनात कोरोनाची धास्ती असल्याचे दिसून येत असल्याने प्रवाशांची संख्या थंडावलेली दिसून येत आहे. बसस्थानकातून अनगोळ, वडगाव, सहय़ाद्रीनगर, देवराज अर्स कॉलनी, अलारवाड, रामतीर्थनगर, कणबर्गी तर ग्रामीण भागातील कंग्राळी बी. के, होनगा, काकती, उचगाव, हंदिगनूर, कट्टणभावी, कुदेमनी, तीर्थकुंडये, बसरीकट्टी, सुळेभावी, मुचंडी, हलगा-बस्तवाड, मास्तमर्डी, चंदनहोसूर, जानेवाडी, संतिबस्तवाड, खादरवाडी, कर्ले, संतिबस्तवाड, जानेवाडी, किणये, मुचंडी, आदी भागात बस धावत आहेत.
बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. शिवाय कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच त्यांना बस स्थानकात प्रवेश दिला जात आहे. प्रवाशांसह बसचे चालक आणि वाहकांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे. निर्जंतुकीकरण करूनच बस प्रवासासाठी वापरण्यात येत आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन एका बसमध्ये प्रवाशांची संख्या 30 ठेवण्यात आली आहे.