अन्यथा प्रा. वेलिंगकर यांच्याच विरोधात भाजपला आंदोलन करावे लागणार. लोकांची दिशाभूल करू नये. खरी माहिती लोकांसमोर ठेवावी. साखळी भाजपतर्फे पत्रकार परिषद.
डिचोली/प्रतिनिधी
भाषा माध्यमाच्या विषयावरून सध्या भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनांमध्ये प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याकडून सरकारवर व भाजप पक्षावर करण्यात येणार खालच्या पातळीवरील टिका आणि त्यांच्याकडून वापरण्यात येणारी भाषा त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभत नाही. त्यांनी आपली भाषा सुधारावी किंवा त्यावर नियंत्रण आणावे. लोकांची चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये. अन्यथा भाजपलाच त्यांच्याविरोधात आंदोलने करावी लागणार, असा इशारा साखळी भाजपचे सदस्य दिपराज प्रभू यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
या पत्रकार परिषदेला राज्य भाजपचे पदाधिकारी मिलींद नाईक, पंचसदस्य राजन फाळकर, सखळी युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घाडी, रामा नाईक, सिध्दांत गावस, प्रतिक नार्वेकर, रामा नाईक, राहुल पारोडकर, भगवंत महाले आदींची उपस्थिती होती.
प्रा. वेलिंगकर यांच्याकडून सध्या गोमंतकीय जनतेची दिशाभूल करण्याचे सत्र सुरू आहे. राज्यातील सरकार हे अल्पसंख्याक शाळांना मदत करीत असून कोकणी मराठी शाळांचे हित जपण्यास फोल ठरल्याचे ते म्हणतात. तसेच कोकणी मराठी नवीन 21 शाळांना या सरकारने परवानगी दिली आहे हेही ते स्वतःच सांगतात. तर या सरकारने त्याव्यतिरिक्त इतर भाषेतील किती शाळांना परवानगी दिली ते स्पष्ट करावे. 21 काकणी मराठी वगळता या सरकारने एकाही इतर भाषेतील शाळेला परवानगी दिलेली नाही. हेही लोकांना त्यांनी सांगणे गरजेचे आहे, असे दिपराज प्रभू यां?नी म्हटले.
माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी संपूर्ण राज्यभर गावागावात कोकणी मराठी शाळा सुरू केल्या होत्या. हे बरोबर आहे, मात्र आज त पूर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. आजच्या परिस्थितीत त्या शाळांची परिस्थिती प्रा. वेलिंगकर यांनी पहायला हवी. 2012 सालघ भाजपचे सरकार आल्यानंतर गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना डॉ. प्रमोद सावंत यांनीच या सर्व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन साज मिळवून दिला. केवळ नुतनीकरणच न करता आतील सर्व साधनसुविधाही निर्माण करून त्या शाळांचा दर्जा वाढविला होता. हे प्रा. वेलिंगकर यांनी ध्यानात ठेवावे.
प्रा. वेलिंगकर यांनी केवळ सरकार व भाजपवर टिका न करता सर्व बाजू योग्यपणे मांडावी. भाजपला संपविण्याची वक्तव्ये करताना एक राजकीय पक्षाला संपविणे सोपे आहे का ? याचा अभ्यास करावा. आज प्रा. वेलिंगकर यांचा अविर्भाव पाहता राज्यातील कोणीही शिक्षित पालक त्यांना आया आंदोलनात पाठिंबा देणार नाही. सध्या सुरू असलेल्या आंदोलनांना मिळत असलेला पाठिंबा पाहता त्यांच्या आंदोलनांची तीव्रता लक्षत येते. भाजपला गोव्यातील लोकांचा पाठिंबा आहे. गेली चार वर्षे गप्प बसून केवळ येणारी विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून हे आंदोलन उभे केले आहे का ? याचे सर्वप्रथम स्पष्टीकरण द्यावे. आणि भाजपविरोधात पुरावे नसताना बोलू नये, असेही दिपराज प्रभू यांनी यावेळी म्हटले.
आम्ही मराठी शाळेतूनच शिक्षण घेत आज समाजात वावरत आहेत मराठी कोकणीचा आम्हलाही अभिमान आहे. मात्र सध्या भाषा माध्यमाच्या विषयावरून प्रा. वेलिंगकर यांच्याकडून सुरू असलेली धरणे पाहता तो निव्वळ निवडणूक स्ट?ट असल्याचे दिसून येते. कारण निवडणुका झाल्यानंतर या आंदोलनांचा कुठे नामोनिशाण नसतो. आज जागतिक स्थरावर इंग्रजी भाषेला मान्यता असल्याने काही जागतिक दर्जाचे व्यवहार आणि संभाषण हे इंग्रजीतूनच कराले लागतात. त्यामुळे इंग्रजी भाषेचीही तेवढीच गरज सर्वांना आहे. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर खऱया अर्थाने ग्रामीण भागातील व शहरी भागातीलही शाळांचे भाग्य उजळले हे त्यांनी लक्षात ठेवावे. मागील काळात भा.भा. सु. मंचच्या आंदोलनांमध्ये आम्ही जरी प्रत्यक्षात सहभागी होऊ शकते नसले तरी आमची मुक संमती असायची. आज प्रा. वेलिंगकर यांची भाषा ऐकल्यास तिही नाहीशी झाली आहे. असे मिलींद नाईक यांनी यावेळी म्हटले.