प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील विविध फायनान्स धारकांनी महिला बचत गटांसाठी कर्ज वितरित केले आहे. मात्र कोरोनामुळे आता हे कर्ज भरणे अवघड झाले आहे. उत्पन्नच काही नसल्यामुळे आम्ही हप्ता भरू शकणार नाही. असे असताना फायनान्सधारक तगादा लावत आहेत. तो तगादा थांबवावा, अशी मागणी विश्व मानवाधिकार परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हुक्केरी तालुक्मयातील बाड व इतर परिसरात विविध फायनान्सधारकांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्जे वितरित केली आहेत. आजपर्यंत आम्ही सर्व कर्ज वेळेत परत केली आहेत. मात्र आता कोरोनामुळे सर्वच व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे कर्जाचा हप्ता भरणे अशक्मय आहे. असे असताना फायनान्सचे अधिकारी व प्रतिनिधी हप्ता भरण्यासाठी नाहक त्रास देत आहेत. तो त्रास थांबवावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रकाश मिलके यांच्यासह हुक्केरी परिसरातील विविध गावातील नागरिक उपस्थित होते.