शांती, सेवा, न्याय, सुरक्षेसाठी प्रतिबंध कामगिरीची दखल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
संपूर्ण देशातील सुमारे 700 पोलीस प्रमुखांपैकी केवळ उत्कृष्ट कामगिरी करणाऱया 50 पोलीस प्रमुखांची निवड ‘फेम इंडिया’ने केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 4 पोलीस प्रमुखांची निवड झाली असून यातील एक अधिकारी म्हणजे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेवून ही निवड करण्यात आल्याने सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
लोकांची सुरक्षा मजबूत करण्याची भावना असेल तर समाजाची प्रगती व विकास होवू शकतो. यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख यांची महत्वपूर्ण भूमिका असते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व भयमुक्त समाजाची निर्मिती करणे, हे मोठे आव्हान असते. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रमुखांची कामगिरी महत्वाची असते. ‘फेम इंडिया’ने देशभरातील पोलीस प्रमुखांच्या कामगिरीची पडताळणी करून सुमारे 700 पोलीस प्रमुख अधिकाऱयांमध्ये 50 लोकप्रिय पोलीस अधिकारी निवडण्यात आले.
या 50 लोकप्रिय अधिकाऱयांमध्ये महाराष्ट्रातील चारच पोलीस अधिकाऱयांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पोलीस प्रमुख मोक्षदा पाटील, डॉ. अभिनव देशमुख, विनिता साहू आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश आहे. डॉ. गर्ग यांनी रत्नागिरी जिल्हय़ात गुन्हेगारी कमी करण्याबरोबरच अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत.