प्रतिनिधी / फोंडा
फोंडा गट काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. खडपाबांध फोंडा येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांच्याहस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कोरोना संक्रमणामुळे फोंडा गट काँग्रेसच्या केवळ चार सदस्यांनी सामाजिक अंतर राखून डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली. यावेळी गट काँग्रेसचे अध्यक्ष अरुण गुडेकर, नगरसेवक विलीयम आगियार व सदस्य कमलेश सिंग हे उपस्थित होते. देशाचे पहिले कायदामंत्री असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अत्यंत प्रगल्भ होते. दलित व समाजातील इतर दिनदुबळय़ांना त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक हक्काविषयी जागृत केले. मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म असल्याचे मानणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते, असे रवी नाईक यावेळी बोलताना म्हणाले.