वृत्तसंस्था/ मुंबई
आर्थिक वर्ष 2019-20या कालावधीमध्ये वित्त संस्थांकडून एक अहवाल नुकताच सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या घोटाळय़ाची प्रकरणे घडली असल्याची नोंद करण्यात आली आहे.
मागील वित्त वर्षामध्ये बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये घोटाळे होणे आणि त्यांची माहिती करुन घेण्यासाठी जवळपास दोन वर्षाचा कालावधी तपासला गेला. 2019-20 मध्ये एकूण 8,707 इतके बँक घोटाळे घडले असल्याची माहिती समोर आली असून यातील 1,85,644 कोटी रुपयांची रक्कम गहाळ झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. मागील वर्षी प्रकरणांची 6,799 इतकी संख्या होती. यामधून 71,543 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.