पोलीस अधिकाऱयांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
प्रतिनिधी/ पणजी
बदली झालेले पोलीस कर्मचीरी अनेक दिवस झाले तरी पणजी पोलीस स्थानकात आलेच नाहीत. त्यामुळे पोलीस अधिकाऱयांनी काढलेल्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. बदली झालेले पोलीस कर्मचारी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाण्यासाठी वशीले बाजी करीत असल्याचे दिसून येत आहे. काहीजण आजारपणाची सुट्टी घेऊन घरी बसले आहेत व बदलीचा आदेश रद्द करण्यासाठी खटाटोप करीत असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस कर्मचाऱयाला पाहिजे त्या ठिकाणी बदली केल्यास त्या आदेशाचे त्वरित पालन केले जाते. मात्र त्यांना न आवडणाऱया किंवा सोयीचे नसलेल्या ठिकाणी बदली झाल्यास योग्य त्या माणसाचा वशीला लाऊन किंवा आजारपणाची सुट्टी घेऊन आदेश रद्द करण्याचा सर्रास प्रयत्न केला जातो.
पणजी पोलीस स्थानक हे राज्यातील मुख्य पोलीस स्थानक आहे. या पोलीस स्थानकात कामाचा भार अधिक असतो. या पोलीस स्थानकात काम करणाऱया कर्मचाऱयांना अनेकवेळा सुट्टीही मिळत नाही. दर दिवशी कायदा सुरक्षाव्यवस्था सांभाळावी लागते. पणजी ही राजधानी असल्याने देशभरातील अतीमहानिय व्यक्ती नेहमी येथे येत असतात. त्यांची सुरक्षा व्यवस्था तसेच दर दिवशी मोर्चा व अन्य विविध कामे असतात इतके करूनही गुन्हेगारी प्रकरणाचा तपास लावणे हे कामही असते. एकूणच पणजी पोलीस स्थानकात कामाचा भार अधिक असतो. त्यामुळे या पोलीस स्थानकात येण्याचे पोलीस कर्मचारी टाळतात. अशावेळी पणजी पोलीस स्थानकात बदली झाली की ती कशी टाळता येईल या साठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरु असतो.
गेल्या काही महिन्यात काढलेल्या बदली आदेशात पणजी पोलीस स्थानकातील तब्बल 50 हून अधिक पोलीसांच्या बदल्या होऊन दुसऱया ठिकाणी गेले आहेत. बदलीचा आदेश आल्यानंतर पणजी पोलीस स्थानकातून बदली झालेल्या पोलिसांनी त्वरित काशा गुंडाळला मात्र ज्यांची पणजी पोलीस स्थानकात बदली झाली आहे ते अद्याप आलेच नाहीत. पहिल्या आदेशात 13 पोलीस कर्मचारी तर दुसऱया आदेशात 27 पोलीस कर्मचाऱयांच्या पणजी पोलीस स्थानकात बदली झाली होती. एकूण 40 पोलीस कर्मचाऱयांपैकी एकाही पोलीसांने पणजी पोलीस स्थानकात हजेरी लावलेली नाही.