गौरी आवळे/ सातारा
उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील 19 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची जीभ कापून निघृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने पुन्हा महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निर्भयाचा हत्या कांड झाले तेव्हा संपूर्ण देश पेटून उठला होता. कायदे कडक करण्याची मागणी करण्यात आली, कायदे कडक ही झाले. मात्र बलात्कार थांबले नाहीत. ही विकृत मानसिकता अजून किती बळी घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून ‘बेटी बचाव’ चा नारा दिला जातोय, पण बेटी की सुरक्षा म्हटलं की सगळे गप्प बसतात. बलात्कार घडला की आंदोलन, कॅन्डल मार्च काढून पिडितेला न्याय मिळवण्यासाठी सगळेच रस्त्यावर उतरतात. या प्रकरणांना दर वेळेस राजकीय वळण दिले जाते. ऐवढे करूनही बलात्कार थांबत नाहीत. फक्त कायदे कडक नको तर विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सरकार का कोणतेही ठोस उपाय योजना करत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेचा निषेध करत साताऱयातील महिलांनी पिडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी ‘तरूण भारत’च्या माध्यमातून केली आहे.
महिला अत्याचारावर राजकारण….
दिल्लीत अत्याचार जसा होतो तसे गल्लीत झाल्यावर जागे व्हा. महिलेवर अन्याय होतो तेव्हा तीची जात बघून अन्याय केला जात नाही. या घटनावर राजकीय पोळया भाजल्या जातात हे बरोबर नाही. दलित संघटना आता पुढे आल्यात कारण ती दलित मुलगी आहे. कोपर्डी वेळी मराठा संघटना पुढे आल्या कारण ती मुलगी मराठा होती. महिलांच्या बलात्काराच्या घटनावर राजकीय पोळया भाजू नका. फाशीची शिक्षा होणार या भीतीने अत्याचार करून खून करण्यात येत आहेत. यामुळे फाशीच्या शिक्षेवर विचार झाला पाहिजे.
ऍड. वर्षा देशपांडे
आरोपींना तात्काळ शिक्षा द्या…
बलात्काराच्या घटना दिवसेदिवस वाढत आहेत. अशा घटनामध्ये आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मात्र असे होत नाही. यामुळे विकृत मानसिकतेचे लोक अत्याचार करायला घाबरत नाहीत. या घटनेचा सर्व महिलांच्या वतीने जाहीर निषेध करते. त्या पिडितेला न्याय मिळालाच पाहिजे ही एकमेव मागणी आहे. तसेच सरकारने वाढत्या बलात्काराच्या घटनांना आळा बसावा म्हणून ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत.
समिंद्रा जाधव, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला आघाडी
निर्भया असो की मनिषा प्रत्येकवेळी एक मुलगी मारली जातेय हे वास्तव आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी अशाच घटनेने देश हादरला असताना त्यातील आरोपींचा एन्काऊंटर झाला. देशात दिवाळी साजरी झाली जणू. त्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने लोकभावना किती तीव्र आहे हेच दाखवून दिले. त्यातून शहाणे व्हावेच लागेल संबंधितांना. तसे न झाल्यास लोक स्वतः एन्काऊंटरची वाट न पाहता अशा नराधमांना ठेचून मारतील. त्यामुळे मुली, स्त्रियांबाबत केवळ पोपटपंची बस्स झाली. त्यांना ताकदवान, शक्तिशाली बनवताना आत्मनिर्भर केले पाहिजे.
डॉ. सुरभि भोसले, जिल्हाध्यक्ष भाजप महिला आघाडी
स्त्राrकडे एक स्त्राr म्हणून पाहण्यापेक्षा माणूस म्हणून पहा. तरच अत्याचार थांबतील. अशा नराधमांना कितीही कठोर शिक्षा झाली तरी जोपर्यंत मानसिकता बदल नाही. तो पर्यंत समाजाला अशा अत्याचारांना तोंड द्यावेच लागत आहे. तेव्हा आपल्या कुटुंबापासून सुरूवात करूया चांगल्या विचारांची, घरातील समाजातील मंहिलांना आदराने वागवूया. अशा घटना घडल्यानंतर पेटून उठण्यापेक्षा, दरररोज अशा घटना होवू नयेत म्हणून आवाज उठवायला हवा. आज आरोपिंना कडक शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र या घटनांचा अभ्यास केला तर बलात्कार लपवण्यासाठी ठार मारण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कठोर शिक्षा ही यावरचा ठोस उपाय म्हणता येणार नाही.