186 रुग्ण कोरोनामुक्त : 39 बळी : 509 रुग्णांवर उपचार सुरू
वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात शनिवार दि. 25 रोजी 57 जणांना कोरोना बाधा झाली असल्याचे आढळून आले तर 186 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त होऊन घरी परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. आतापर्यंत कोविड बाधित संख्या 1225 तर 680 बरे झाले. 39 बळी तर 509 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शनिवारी बागलकोट येथे 20, जमखंडी 13, मुधोळ 8, बदामी 8, गुळेदगुड्ड 2, इलकल, बिळगी, हुनगुंद व अन्य जिल्हय़ातील 1 असे एकूण 57 बाधित झाले. 186 बरे झालेल्यांत बागलकोट नवनगर कोविड केअर सेंटर येथून 86, जमखंडी कोविड सेंटर येथील 27, हुनगुंद कोविड सेंटर येथून 14, जिल्हा हॉस्पिटलमधून 42 जण बरे होऊन घरी परतले.
नवनगर येथील कोविड केअर केंद्रात सेवा बजावत असलेला आरोग्य खात्याचा कर्मचारीही कोरोनामुक्त झाला असून आज घरी परतला. अद्याप 811 व्यक्तींच्या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 23096 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असून 20820 निगेटिव्ह, 1225 पॉझिटिव्ह, 39 बळी, 680 बरे झाले तर 509 जणांवर उपचार सुरू आहेत. 95 कंटेन्मेंट झोन असून संस्थात्मक क्वारंटाईनमधून 6296 जणांची सुटका झाली आहे.
जमखंडी तालुक्मयातील हुन्नूर येथील 53 वर्षे वयाची व्यक्ती दि. 17 रोजी खासगी दवाखान्यात दाखल झाली होती. तिचा दि. 25 रोजी मृत्यू झाला. अंत्यसंस्कार कोविड मृत्यूच्या निर्देशानुसार करण्यात आले असून या व्यक्तीच्या कुटुंबाने व संपर्क आलेल्या व्यक्तींनी सरकारी दवाखान्यात आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. ए. एन. देसाई यांनी केले आहे.