गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी : नागरिकांची दमछाक
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात विविध मार्गांवर सुरू असलेली विकासकामे, अर्धवट स्थितीत असलेले रस्ते, रस्त्यांवर टाकण्यात आलेले बांधकामाचे साहित्य आणि गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात झालेली गर्दी यामुळे गुरुवारी शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. यातून बाहेर पडताना नागरिकांची दमछाक झाली. शासन एकीकडे कोरोनाचे निर्बंध हटवत आहे तर दुसरीकडे होणारी वाहतुकीची कोंडी धोक्मयाची घंटा देत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन कोलमडल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रविवारपेठेमध्ये गुरुवारी अवजड वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बराचकाळ बाजारपेठेत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे यातून बाहेर पडताना पादचाऱयांचे हाल झाले. बाजारपेठेत माल घेऊन आलेली वाहने एका बाजूला थांबविली जातात. दरम्यान पुन्हा एखादे अवजड वाहन आले की वाहतुकीची कोंडी होते. गणेश चतुर्थी जवळ आल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच नियमांचे उल्लंघन करून वाहने रस्त्यातच उभी केली जातात. रस्त्यात असलेल्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि गणेशोत्सवाची तयारी यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. शहरातील मुख्य गल्ल्यांमधून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचादेखील फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.