पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून निघालेला तोडगा व्यापाऱ्यांना अमान्य
प्रतिनिधी/कोल्हापूर
बॉक्समधील गुळाचे सौदे बंद ठेवल्याने बाजार समितीत अडीच कोटीचा गूळ भर पावसात रस्त्यावर ठेवण्याची वेळ गूळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली. होती मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यापाऱ्यांना सक्त सूचना करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका सर्वमान्य तोडगा तातडीने काढावा असे आदेश दिले होते यानुसार शेतकरी व्यापारी आणि बाजार समितीतील काही संचालकांच्या उपस्थितीत बैठक होऊन तोडगा निघाला. गूळ बॉक्सचे सरासरी 18.500 किलोग्रॅम वजन असावे, यासह अन्य महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले होते. मात्र दोनच दिवसात व्यापाऱ्यांनी अमान्य असल्याचे सांगत मंगळवारी सकाळी सौदे बंद ठेवले. यामुळे शेकडो गुळाची वाहने रस्त्यावर उभी आहेत.