सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, लॉकडाऊन कालावधी वाढविण्यासाठी वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा फेलाव वेगाने होत आहे. आतापर्यंत सहा हजारांहून बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव झालेल्या परिसरातील नागरिकांची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. दरम्यान, सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत आदेश द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ वकिलांनी पत्राव्दारे केली आहे.
अलाहाबाद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, चाचणी करून बाधित रुग्णांना विलगीकरणात ठेवणे हाच कोरोनावर मात करण्याचा सध्या प्रभावी उपाय आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोरोना रुग्ण असणाऱया परिसरातील सर्व नागरिकांच्या चाचणी करण्याचे आदेश द्यावेत.