200 हून अधिक गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप : भटक्मया जनावरांनाही चारा-पाण्याची सोय
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गोर-गरीब कष्टकऱयांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. या कठीण काळात अनेक जण अल्पोपहार व अन्न देण्यासाठी पुढे सरसावलेले पहायला मिळत आहेत. बिलिव्ह फौंडेशनतर्फे समाजातील गरजूंना अन्नाची पाकिटे व पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या.
दरम्यान, शहरात फिरणाऱया भटक्मया जनावरांची व कुत्र्यांची संख्या अधिक आहे. मात्र लॉकडाऊनमुळे भटक्मया जनावरांना देखील चारा-पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. याची दखल घेत फौंडेशनतर्फे भटक्मया जनावारांना चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शिवाय शहरातील भटक्मया कुत्र्यांना देखील खाद्य देण्यात आले. फौंडेशनतर्फे आतापर्यंत साधारण 200 हून अधिक गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली आहेत. तर 200 हून अधिक भटक्मया जनावरांच्या चारा-पाण्याची सोय करण्यात आली आहे.
याप्रसंगी फौंडेशनचे कार्यकर्ते सौरभ सावंत, पराग शिंदे, राहुल गावडे, प्रितम जांगळे, भुजंग निलजकर, शुभम निलजकर, सखाराम देसाई, शंकर जे., अजय पवार, सुमित सांगुकर यासह गोंधळी गल्लीतील इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.