मुंबई
आसाम राज्यातील नुमालीगड रिफायनरी प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच घेतला आहे. यातील आपला संपूर्ण वाटा बीपीसीएलने ऑइल इंडिया लिमिटेड आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड यांना 9 हजार 876 कोटी रुपयांना विक्री करणार असल्याचे सांगितले आहे. सरकार बीपीसीएलच्या खासगीकरण प्रक्रियेसाठी प्रयत्न करते आहे. आसाम शांती करारानुसार सरकारने नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (एनआरएल) ला सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्यासाठी योग्य ते पाऊल उचलले आहे.