बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात काही संघटनांच्या देशविरोधी कारवायांच्या चौकशीसाठी बेंगळूर येथे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कार्यालय सुरू करण्याच्या मागणीला केंद्राने सहमती दर्शविली आहे, असे बेंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी रविवारी सांगितले.
सूर्या यांनी सांगितले की आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि बेंगळूर येथे एनआयए कार्यालय स्थापन करण्याची विनंती केली आणि मंत्र्यांनी त्याला मान्यता दिली असल्याचे सांगितले.
केजी हळ्ळी आणि डीजे हळ्ळी येथे झालेल्या हिंसक घटनांमुळे बेंगळूरमध्ये एनआयए कार्यालय सुरू करण्याची मागणी गृहमंत्र्यांनी मान्य केल्याचे खासदार सूर्य यांनी स्पष्ट केली आहे. राज्यात होणाऱ्या हिंसा स्पष्टपणे दर्शविते की काही संस्था देशविरोधी कार्यात सहभागी होत आहेत. सुर्या यांनी पत्रकारांना सांगितले की, गुन्हेगारांवर कायम नजर ठेवणे आवश्यक असल्याने येथे एनआयएचे कार्यालय होणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत, बेंगळूर हे दहशतवादी कारवायांचे केंद्रबिंदू बनले आहे, जे शहरातील एनआयएने केलेल्या सिद्ध झाले आहे.
तेजस्वी यांनी केलेल्या मागणीला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी बेंगळूरच्या विविध प्रकारच्या कांद्याला निर्यात बंदीतून मुक्त करण्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. सूर्या यांनी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानले आहेत.