बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा शनिवारी पासून सुरू झाल्या. विद्यापीठाच्या ६०० हून अधिक संलग्न महाविद्यालयांतील ६२ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी बेंगळूर शहरी, बेंगळूर ग्रामीण, कोलार, चिकबळ्ळापूर आणि रामनगर जिल्ह्यातील २०५ केंद्रांवर अंतिम परीक्षा सुरु झाली.
विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार स्वच्छता, मास्क वापर आणि सामाजिक अंतर राखणे यासह नियमांचे पालन करण्याच्या महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. सैद्धांतिक परीक्षा ऑक्टोबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल. पुढील दोन आठवड्यांनंतर प्रात्यक्षिक परीक्षा त्यानंतर सिद्धांत परीक्षा घेण्यात येणार आहेत. डिजिटल मूल्यांकन प्रणालीचा वापर करून उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन केले जाणार आहे. परीक्षा संपल्यानंतर एका महिन्यात निकाल येणे अपेक्षित आहे.