‘कोटा फॅक्ट्री’ अभिनेत्री अहसास चन्नाची तक्रार
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्री अहसास चन्नाने बालकलाकार म्हणून काम केल्यावर मधल्या काळात ब्रेक घेतला असता इंडस्ट्रीला माझा विसर पडल्याचे तक्रारवजा विधान केले आहे. अहसासला ‘वास्तू शास्त्र’ आणि ‘कधी अलविदा ना कहना’ यासारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून पाहिले गेले होते. पण आता तिला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ओटीटी प्लॅटफॉर्म सीरिज कोटा फॅक्ट्रीची अभिनेत्री म्हणून ओळखले जात आहे.
एक विद्यार्थिनी म्हणून अभिनयातून 6 महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. 10 वीच्या बोर्ड परीक्षांपूर्वी हा ब्रेक घेतला होता. मनोरंजनाची इंडस्ट्री म्हणजे एक शर्यत असून येथे प्रत्येक जण पळतोय. 6 महिन्यांच्या ब्रेकने माझे जीवन बदलले. लोक, कास्टिंग डायरेक्टर मला विसरले. डिजिटल स्पेसमध्ये पाऊल टाकण्याचा माझा निर्णय मात्र योग्य ठरल्याचे ती सांगते. अहसासचे इन्स्टाग्रामवर 2.7 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अलिकडेच ती टीव्हीएफच्या ‘कोटा फॅक्ट्री’च्या दुसऱया सीझनमध्ये दिसून आली होती.