कादंबरीवर बंदी घालण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
‘भरतनगरी’ ही कादंबरी लिहिण्यात आली आहे. या कादंबरीचे लेखक बरगुर रामचंद्राप्पा यांनी गंगामातेचा अवमान केला आहे. या कादंबरीमध्ये अवहेलना केली आहे. यामुळे आपल्या समाजाचा हा अवमान असून संबंधित लेखकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गंगामठ कोळी समाज यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाभारतावर आधारित ही कादंबरी आहे. गंगापुत्र भीष्म यांचा उल्लेख करताना चुकीचा करण्यात आला आहे. कर्नाटकामध्ये 60 लाखांहून अधिक हा समाज आहे. या सर्वांचा हा अवमान झाला असून संबंधित लेखकावर कारवाई करावी तसेच त्या पुस्तकावर बंदी घालावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आर. ए. गस्ती, पी. आर. दासनट्टी, ए. एस. नाईक, आय. वाय. पुजार, ऍड. एस. पी. शिरगी, ए. एस. पाटील, जे. के. शिरगी यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.