भुमीगत वीज वाहिन्यांचे चाळीस टक्के काम पुर्ण : वीजमंत्री काब्राल
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यातील विविध भागात वीज भुमीगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे विशेष करून किनारी भागातील वीज वाहिन्या टाकण्याचे चाळीस टक्के काम आतापर्यंत पुर्ण झालेले आहे . भविष्यात स्थानिक लोकांनी स्वताच्या घरात तसेच आस्थापनात सरकारी अनुदानस्वरुप मिळणाऱया सोलार वीज यंत्रणेचा लाभ करून घेण्याचे आवाहन वीजमंत्री निलेश काब्राल यांनी कळंगुटात केले.
दरम्यान, राज्यातील कांही भागात होणाऱया वीज चोरीचे प्रकार रोखण्यासाठी नवीन स्मार्ट मिटर योजना कार्यान्वति करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आराडी कळंगुट येथे नव्याने उभारण्यात येणाऱया वीज उपकेद्राची पायाभरणी केल्यानंतर मंत्री काब्राल बोलत होते.
दरम्यान, येथील उपकेद्रातील वीज यंत्रणा कार्यान्वति झाल्यास येत्या वीस वर्षापर्यत याभागात वीजेची समस्या राहाणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले. सांळगावात येत्या एक दोन वर्षात बहुउद्देशीत वीज प्रकल्प उभा राहाणार असल्याचेही मंत्री काब्राल यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो, सरपंच शॉन मार्टीन्स, कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नाडीस, वीज अभियंता रेड्डी, माजी सरपंच फ्रान्सिस्को रॉड्रीगीश तसेच मोठय़ा प्रमाणात स्थानिक ग्रांमस्थ उपस्थित होते.
दरम्यान, कोवीड महामारीचा काळात दोन वर्षापुर्वी नियोजित करण्यात आलेल्या, आराडी -कळंगुट येथील नव्या वीज उप केद्राच्या उभारणीसाठी दोन कोटी चौतीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल वीज मंत्री काब्राल यांचे आभार मानले तसेच येथील केद्रासाठी कोमुनिदादची जमीन अत्यल्प दरांत मिळवून दिल्याबदद्ल स्थानिक एलन पिंटो कुटुंबीयांचे आभार मानले. सरपंच शॉन मार्टीन्स यांनी यापुढे वीज समस्येवरून पंचायत मंडळाला लोकांच्या रोषास सामोरे जावे लागणार नसल्याचे सांगितले तसेच हल्लीच कळंगुटसहित राज्याला बसलेल्या तौक्ते वादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी स्थानिक वीज कर्मचारी तसेच पंचायत मंडळ आणी खुद्द मंत्री मायकल लोबो यांनी घेतलेल्या कष्टाची उपस्थितांना माहिती करून दिली.