मुंबई / ऑनलाईन टीम
भाजप नेते अनेकवेळा विविध वादग्रस्त वक्तव्यावरुन अडचणीत आल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. तशीच घटना पुन्हा घडली आहे. देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी कर्तव्यावर असलेल्या जवानाच्या घरी श्रद्धांजली वाहण्यासाठी पहोचले. जम्मू -काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेले भारतीय सैन्य दलातील जवान रवी कुमार कुट्टीमणी यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला ही लज्जास्पद घटना आली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी गुरुवारी बाहेर पडले शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मात्र जीवंत सैनिकाच्या घरी पोहोचले. या जवानाच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी, जमीन देण्याची घोषणाही ही त्यांनी केली. स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती दिल्याने असे घडल्याचे म्हटले जात असले तरी नारायणस्वामी त्यांच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेचा भाग म्हणून कर्नाटक राज्यातील गडग जिल्ह्यात होते. त्यावेळी ते श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाच्या घरी गेले आणि ही मोठी चूक झाली.
नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात नुकतेच मंत्री नारायणस्वामी बनले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी या चूकीसाठी नंतर स्थानिक भाजप नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. मात्र, शहीद जवान हिरेमठ यांच्या घरी मंत्री गेले नाहीत. आमच्या घरी कोणी आले नाही. मंत्री जिवंत असलेल्या एका जवानाच्या घरी गेले. मला माझा मुलगा परत हवा आहे, असे शहिद जवानाच्या आईने म्हटले आहे.