प्रतिनिधी/ रत्नागिरी
यंदा जिल्हाभरातील भात लागवडीखाली 21 टक्यांपेक्षा अधिक जमीन आल्याने जिह्यातील पीकस्थिती समाधानकारक असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी दिली. भाताबरोबरच नाचणी पीक क्षेत्रामध्ये 11 टक्
क्याहून अधिक वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
यंदा कोरोनामुळे चाकरमान्यांनी गावची वाट धरल़ी यंदा जिह्यामधील 69 हजार हेक्टरवरती भातशेती करण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवण्यात आला होत़ा दरवर्षी सरासरी 65 हजार हेक्टरवरती भातशेती केली जात़े मात्र यंदा चाकरमान्यांमुळे या क्षेत्रामध्ये वाढ झाली आह़े यंदा जुलै महिन्यामध्ये पाऊस मंदावला होत़ा पण ऑगस्टमध्ये पावसाने जिल्हाभरामधील सरासरीची कसर भरुन काढल्याने 21.19 टक्क्यापेक्षा जास्त जमिनीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत भात लागवडीखाली क्षेत्र आले आह़े समाधानकारक पावसामुळेही भाताबरोबरच नाचणी पीकाच्या क्षेत्रामध्ये 11 टक्के वाढ झाली आह़े
समाधानकारक पावसामुळे भातशेतीही जेमाने आल्यामुळे शेतकरी सुखावला आह़े काहीवेळा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पीकाला रोगाची लागण होण्याची शक्यता असत़े पाऊस पडला नाहीतर अनेक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असत़े जर किडींचा प्रादुर्भाव झाला तर उत्पादनात घट होण्याची शक्यता असत़े मात्र सध्यातरी जिह्यामध्ये पीक परिस्थिती समाधानकारक असल्याची माहिती घोरपडे यांनी दिल़ी आतापर्यंत जिल्हाभरामध्ये अडीज हजार म़ि म़ी पावसाने मजल मारली आह़े