ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरणाऱ्या आणखी 54 मोबाईल ॲप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. या ॲप्समध्ये चीनी ॲपचाही समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
नव्याने बंदी घालण्यात आलेल्या ॲप्समध्ये सर्वाधिक क्लोन करण्यात आलेली ॲप्स आहेत. यात 2020 पासून बंदी घालण्यात आलेली ॲप्सही आहेत. 2020 नंतर देशात एकूण 270 ॲपवर बंदी घालण्यात आली आहे. आणखी 50 ॲप्सवर बंदी घालण्यात आली असून, एकूण बंदी घातलेल्या ॲप्सची संख्या 320 पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.