ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो. त्यासंदर्भात आपल्याकडे पुरावे आहेत, असे पाकचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी म्हटले आहे.
कुरैशी म्हणाले, पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. भारताने यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या सहकारी देशांची मदत घेण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याबाबतचे पाककडे पुरावे आहेत. भारत त्यांच्या देशातील अंतर्गत मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी पाकवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू शकतो.
दरम्यान, नियंत्रण रेषेवर आणि भारत पाक वर्किंग बॉण्ड्रीवर पाकिस्तानच्या सैनिकांना हाय अलर्ट देण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने लिहिले होते.