वृत्तसंस्था/ कैरो
येथे झालेल्या आयएसएसएफ शॉटगन विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक स्किट नेमबाजी प्रकारात भारतीय नेमबाजांची कामगिरी निराशाजनक झाली. या क्रीडा प्रकारात भारताच्या धालीवाल आणि मिराज अहमद खान यांना सातव्या तर सेखाँ आणि बावा यांना दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या क्रीडाप्रकारातील पात्र फेरीमध्ये धालीवाल आणि मिराज यांनी 150 पैकी 137 गुण नोंदविले तर भारताच्या सेखाँ आणि बावा या जोडीने 150 पैकी 134 गुण घेतले. या क्रीडाप्रकारात रशियाच्या नेमबाज संघांनी आपले वर्चस्व राखताना तिन्ही सुवर्णपदक पटकाविली.