राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुका भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने राधानगरी तहसीलदार कार्यालयावर आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी मोर्च्या काढण्यात आला. एस टी स्टॅन्ड पासून सुरवात झालेल्या हा मोर्चा तहसीलदार कार्यालयात येऊन आपल्या विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मीना निंबाळकर यांना देण्यात आले,
यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे, महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकासाठी शासनाने किमान प्रतिगुंठा 1000 रुपये नुकसानभरपाई द्यावी, थकीत वीज बिल शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय ऊस बिलातून वसूल करू नये, राज्य शासनाने एफ आर पी रक्कम जाहीर करावी, शेतकरी सन्मान योजने अंतर्गत एक रकमी वेळेत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली 50000 रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम व्याजासह त्वरीत द्यावी, भात व सोयाबीन खरेदी केंद्रे आधारभूत किंमतीने ताबडतोब सुरू करावी, केंद्र व इतर राज्या प्रमाणे शासनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, ऑनलाइन पीक पाहणी बंद करून पूर्ववाट पध्दतीने चालू करावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला
यावेळी शेकाप सदस्य एकनाथ पाटील ,तालुका सरचिटणीस अंबाजी पाटील, दत्तात्रय पाटील तारळे, संजय डकरे,मोहन पाटील, विष्णुपंत एकशिगे,शिवाजी सावंत आणासो पाटील, शिवाजी वाघूर्डेकर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.