मुंबई /प्रतिनिधी
तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्फोटांची मालिका सुरूच आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ५ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, स्फोटात जखमी झालेल्या रूग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
दरम्यां, मिळालेल्या माहितीनुसार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. आणि त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती.