महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाचा दोन दिवसांचा गदारोळ आता बऱयापैकी कमी झाला आहे. धुरळा खाली बसला आहे आणि पहावे तिकडे नेते एकमेकांची भेट घेत असल्याचे वृत्त येत आहे. ऋणानुबंधाच्या या भेटी तृष्टतेतून (संतोषपूर्वक) होत आहेत की रुष्टतेतून (नाराजीतून) होत आहेत हे समजायला मार्ग नाही. मात्र भेटी घडत आहेत आणि त्या ऋणानुबंधातून घडत असल्याचा हाव भाव मात्र नेते करताना दिसत आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढून आणि आपल्या सरकार विरोधात स्वबळाचा नारा देऊन झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या आधीच नानांची तक्रार घेऊन ऊर्जा मंत्री नितीन राऊत ही दिल्लीला जाऊन आले होते. पण, ही भेट नेते नाराज आहेत म्हणून, की नेते आनंदी आहेत म्हणून झाली, हे कळू द्यायच्या आत नानांनी आणखी हल्ले चढवले. आपल्यावर मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची पाळत आहे अशा आशयाचे वक्तव्य केले. नंतर आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असे सांगत भाजपवर हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षपदाचा आणि स्वतःच्या मंत्रीपदाचाही मुद्दा चर्चेला आणला. नानांना पक्षश्रे÷ाrंनी काय मंत्र दिला माहीत नाही. मात्र अजितदादांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. नाना पटोले लहान आहेत असे सांगत पवारांनीही त्यांना निर्लेखित करत हल्ला केला. हे घडत असतानाच काँग्रेसचे राज्यातील नेते पवारांना जाऊन भेटले. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनीही पवारांची भेट घेतली. दरम्यानच्या काळात अजितदादांनी आपण आणि मुख्यमंत्र्यांनी जेवण दिले मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांनी अद्यापपर्यंत जेवण दिले नाही असा गौप्यस्फोट केला. सरकार आणि मित्र पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एकत्र येण्याला काँग्रेसमंत्र्यांनी निमित्त काढावे म्हणजे तीन पक्ष आणि इतर मित्रपक्ष यांच्यात ऋणानुबंध कायम राहील असे सुचवले. अर्थात मित्रपक्षांच्या गाठीभेटी घेण्याची गरज या नेत्यांना आता वाटण्याचे कारण, वरील सर्व गाठीभेटी मागे दडले आहे. विधानसभेचे अध्यक्ष नेमण्यासाठी सरकारला नियमात बदल करायचा आहे. नाराज मित्रपक्ष सरकारला मतदान करणार नाहीत आणि 170 मतांची भरभक्कम आघाडी कमी होईल असे त्यांना वाटत आहे. परिणामी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक खुल्या पद्धतीने म्हणजेच आवाजी मतदानाने हात उंचावून व्हावी यासाठी नियम बदलायला सत्ताधारी सरसावले आहेत. पण विरोधी पक्ष नेत्यांचा गुप्त मतदानाचा नियम बदलायला विरोध आहे. छोटय़ा सत्ताधारी मित्र पक्षांनाही गुप्त मतदान पद्धत हवी आहे. कुणाच्या आणि कशाच्या गाठीभेटी घडल्या कुणास ठाऊक. पण, मित्रमंडळींनी आपल्या अकरा कलमी मागण्या पुढे केल्या आणि त्या मान्य होणार असतील तरच आवाजी मतदानाची शक्मयता वर्तवली. एकूणच वाटाघाटीतून सर्वांचे समाधान होण्याची शक्मयता आहे. गाठीभेटीत इतके सारे साधते म्हटल्यानंतर राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ स्वतः हून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गाठ घेण्यासाठी त्यांच्या सागर बंगल्यावर गेले. केंद्र सरकारकडून ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डाटा मिळवण्यास मदत करा आणि या लढय़ाचे नेतृत्व तुम्ही करा अशी गळ भुजबळ यांनी फडणवीस यांना घातल्याचे समजते. फडणवीस यांनी त्यांच्या विनंतीनुसार आपली तयारी असल्याचे सांगून टाकले. यावर रत्नागिरीत सालाबादप्रमाणे सहकुटुंब भाताची शेती करत असलेल्या आमदार भास्करराव जाधव यांना काय वाटले असेल? विधिमंडळ अधिवेशनात भुजबळांच्या प्रस्ताव सादर करण्याच्याही आधी त्यांनी फडणविसांना बोलू दिले. नंतर भुजबळांनी खुलासा करत असताना आधी त्यांना ठराव पटलावर ठेवायला लावला. त्यानंतर फडणविसांना बोलण्याची पुन्हा संधी न देण्याची भूमिका घेतली. गदारोळ होताच कामकाज तहकूब केले. परिणामी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जो दंगा झाला त्यातून भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करावे लागले. इतके सारे होऊनसुद्धा भुजबळ आणि फडणविसांनी एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि आपण मात्र भात रोपांच्या गाठी सोडतोय, हे त्यांनी कसे बरे पचवून घेतले असेल? पण एकूणात गाठीभेटींच्या सत्राने या आठवडय़ाची सुफळ सांगता होत आहे. आता देशपातळीवरील सरकार आणि विरोधकांची गाठभेट संसदेच्या अधिवेशनात होणारच आहे. फक्त तिथे त्यांच्या भूमिका बदललेल्या असतील. यापूर्वी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या झालेल्या भेटीतील तुष्टता आणि रुष्टतेचा काही परिणाम संसदेच्या अधिवेशनात जाणवतो का ते पहायचे. तसेही मराठा आरक्षणाबाबतीतील सर्वोच्च न्यायालयाने सोपवलेले केंद्राकडील अधिकार राज्याला पूर्ववत बहाल करण्याच्या निमित्ताने मोदी 102 व्या घटना दुरुस्तीत पुन्हा एकदा दुरुस्ती करतील असे बोलले जात आहे. त्याचा परिणाम मराठा आरक्षण राज्याने द्यायचे की केंद्राने याबाबतच्या पक्क्या निर्णयावर होणार आहे. राज्यावर पुन्हा ही जबाबदारी आली तर पुन्हा मराठा आरक्षण देण्याची काळजी घ्यावी लागणार हे स्पष्टच आहे. भेटीतील ऋणानुबंधाच्या मागे असणाऱया या साऱया गनिमी काव्याचा मात्र जनतेला अंदाज येणे अवघडच. ‘देव दीनाघरी धावला ’ या नाटकातील गीतकार बाळ कोल्हटकरांच्या पहाडी रागातील ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ गीताची आठवण आणि समारोपाच्या ओळीतील ‘कधी जवळ सुखाने बसलो, दुःखात सुखाला हसलो, कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो, सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा, जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी…’ प्रमाणेच या वाळूत मारलेल्या रेघा आहेत…लाटेसोबत लुप्त होणाऱया…
Previous Articleबांगलादेशचा झिंबाब्वेवर दणदणीत विजय
Next Article पाठय़पुस्तकाचे मंगळवारपासून होणार वितरण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.