ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मध्य आणि उत्तर भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट असून, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बहुतेक भागात पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास असेल. झारखंडमध्येही येत्या दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याबरोबर दक्षिणेकडे असलेल्या तामिळनाडू, केरळ, माहे आणि कर्नाटक या किनारपट्टीच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात 14 आणि 15 एप्रिल रोजी वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.