बेंगळूर उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह राज्यातील 3 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी केली. मात्र याबाबतची सुनावणी शुक्रवार दि. 13 रोजी बेंगळूर उच्च न्यायालयात आहे. निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून तिसऱया लाटेची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुका होणार की, कोरोनाच्या कारणास्तव लांबणीवर पडणार याबाबतचा निर्णय सुनावणीवेळी होण्याची शक्मयता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोना कालावधीत घेतल्या जाणार नाहीत अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. तसा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. मात्र बेंगळूर उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरित सुनावणीवेळी निवडणुकाबाबत राज्य निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे.
घटनेतील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या नाहीत, अशी विचारणा केली होती. तसेच निवडणूका वेळेत घेण्याची सूचना देखील केली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका घेण्यात येवू नये, अशी विनंती राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आणि निवडणूक घेण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. त्यामुळे ही सुनावणी शुक्रवार दि. 13 रोजी होणार आहे. यावेळी सरकारच्यावतीने आपले म्हणणे मांडण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच केरळ आणि महाराष्ट्र अशा राज्यांच्या सीमावर्ती भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेळगावसह राज्यांच्या सीमेवरील जिल्हय़ांमध्ये विकेंड कर्फ्यू तसेच नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात तिसऱया लाटेची शक्मयता असल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात यावी अशी विनंती राज्य सरकारच्यावतीने उच्च न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे निवडणूक होणार की, लांबणीवर पडणार त्याबाबतचा निर्णय आजच्या सुनावणीवेळी होण्याची शक्मयता आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मनपा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याने शहरवासियांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.