ऑनलाईन टीम / नांदेड :
नांदेडच्या किनवट तालुक्यातील मनसेचे शहराध्यक्ष सुनील ईरावार यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी सुनीलने आत्महत्या केल्याचे समोर आले. आर्थिक अडचणीतून त्याने ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.
सुनीलने आत्महत्येपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कुटुंबियांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात यावर राजकारण केलं जात. या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत.’
तसेच अखेरचा जय महाराष्ट्र… यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मी माझे आयुष्य स्वखुशीने संपवत आहे, असे सुनीलने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.