ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे पुढे ढकलली आहे.
राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यावर सुनावणी झाली. या सुनावणीला सरकारी वकील मुकूल रोहतगी उपस्थित नव्हते. त्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.
पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. पण आजची सुनावणी नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे पार पडली. त्यामुळे ज्या खंडपीठाने आरक्षणाला स्थगिती दिली, त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी नको अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.