कोरोनाच्या महामारीत जग भयकंपित झाले आहे, तर दुसऱया बाजूला कोरोनापूर्वीचे जग आणि नंतरचे जग अशी विभागणी होऊ लागली आहे. ही विभागणी होताना महत्त्वाची गोष्ट काय घडली असेल, तर माणसाला नैसर्गिकरित्या जगण्याची ओढ लागली आहे. हाच या कोरोनाच्या आधीच्या आणि नंतरच्या जगाचा कळीचा मुद्दा आहे. आपण जर निसर्गाप्रमाणे जगलो असतो, तर जगाची अशी दोन भागात विभागणी झालीच नसती. माणसाने कल्पनाही केली नसेल, असे परिणाम जगाला कोरोनामुळे भोगावे लागत आहेत. श्रीमंत आणि गरीब अशी दरीच कोरोनाने पुसून टाकली आहे परंतु, आपल्या आधुनिक युगाच्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्याला, असे सांगता येईल, की कोरोनाच्या हातातच जगाचा रिमोट आहे. कोरोनापूर्वी आपण म्हणायचो, जगात असा कोणताही आजार नाही, की त्याच्या योग्य त्या उपचारासाठी औषधाची निर्मिती केली गेली नाही. पण आता याउलट म्हणावे लागत आहे, की ‘कोरोना बरा करणाऱया औषधाची निर्मिती करा आणि पारितोषिक मिळवा.’ यावरून कोरोनाने जगात थैमान घालून जगातल्या प्रत्येक माणसाला किती हतबल केले आहे, हेच दिसून येते. यातून आपण सर्वच जण एका वेगळय़ाच संक्रमणातून जात आहोत. माहिती तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि आपल्याला जग जिंकल्याचा आनंद होऊ लागला. सोशल मीडियामुळे आपल्यातला संवाद हरवला, तरी जग किती जवळ आले, अशा गमजा आपण मारू लागलो. पण याच सोशल मीडियाने कोरोनाच्या काळात कहर केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या आधी आणि नंतर सोशल मीडियात नेमका काय फरक झाला असेल, तर कोरोनाबाबत अनेक अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण झाले. नको तितक्मया माहितीचा भडिमार मिनिटा-मिनिटाला होऊ लागला आहे आणि त्याचा मनावर उगाचच ताण येत आहे. यातून भीतीचे वातावरण तयार केले गेले. जातीय-धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. शेवटी शासनाला सोशल मीडियासाठी काही नियम लादावे लागले. तरीही काही गोष्टी चांगल्या घडत गेल्या आहेत. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचार करणाऱया सगळय़ांनाच हे आयुष्य क्षणभंगूर आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. आपले पाय जमिनीवरच असायला हवेत, नाहीतर आपली भूमी ही आपली राहणार नाही, याचाही अनेकांना प्रत्यय येऊ लागला आहे. लोकसंख्या वाढीचा फटका सगळय़ांनाच बसला आहे. यात आधी माणूस निसर्गापासून दूर गेला आणि नंतर निसर्गच त्याच्या जवळ यायला तयार नाही. यातून पर्यावरणाची कमालीची हानी झाली होती, प्रदूषणात वाढ होऊन मोठमोठय़ा शहरात माणसांचा जीव घुसमटू लागला. माणसाने जंगलाची मोठय़ा प्रमाणात तोड केल्यामुळे प्राणीच नागरी वस्तीत दिवसाढवळय़ा फिरू लागले. मात्र, आता कोरोनामुळे माणसं घरात अनेक दिवस बंदिस्त झाल्यामुळे वाहनांचाही अतिरेक थांबला. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. प्रदूषणात घट झाली आणि प्राणीही शांतपणे जंगलात वावरू लागले. पक्ष्यांचा किलबिलाट स्पष्ट ऐकू येऊ लागला. याच काळात माणसांना विश्वासार्हता महत्त्वाची वाटू लागली. यातून आपल्या घरात सकाळीच येणारे वृत्तपत्र वाचायला अधिक विश्वासार्ह वाटू लागले आहे. माणसाचा मुखवटा गळून पडला की नेहमीच अशा चांगल्या गोष्टी जगात घडत असतात. आजची वस्तुस्थिती लक्षात घेता, कोरोनाच्या या महामारीतून माणसाला खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याची बरीच गृहितके त्याला बदलावी लागणार आहेत. जग कधीच एकरेषीय नव्हते. साहजिकच त्यातून मानवाला खूप गुंतागुंतीतून जावे लागते. पण माणसाने त्याचा कधी गांभिर्याने विचारच केला नाही. पण आता आपण एकरेषीय जगून चालणार नाही हेही अनेकांना कळून चुकले आहे आणि ही चांगलीच घटना आहे. यामुळे आता यापुढील काळात माणसाला विज्ञान, अर्थशास्त्राrय, आरोग्य, मानसिक, सामाजिक, कला, साहित्य, धार्मिक अशा सर्व घटकांकडे बदलाच्या स्वरुपात पहावे लागेल. या परिणामांची व्यामिश्रता आधी समजून घ्यावी लागेल. प्रत्येक माणूस चैनीत जगण्याला महत्त्व देत होता. त्यातून निष्ठा लयाला गेली होती, पण यातून निष्ठेचे महत्त्व कळेल आणि त्यातून पुन्हा माणूस माणसात येईल, अशी आशा आपण बाळगूया. या साथीची झळ युरोपीय देशांना जास्त सोसावी लागली आहे. त्यातून सर्वाधिक हानी झालेले देश योग्य तो धडा घेतीलच. 1990 नंतर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि सारे जग एकमेकात गुंतून गेले. वेगवेगळय़ा देशांचे हितसंबंध जोडले गेले. त्यामुळे परस्पर अवलंबून राहण्याला गती प्राप्त झाली. यात प्रत्येक देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारीकरणावर आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही हितसंबंध महत्त्वाचे ठरले. पण, आता मात्र अशा साथीच्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येक देशाला भविष्यात स्वतःची अशी आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यावाचून पर्याय उरलेला नाही हे अनेक देशांना कळून चुकले आहे. यासाठी मोठा निधी लागणार आहे. राजकीय यंत्रणेसाठीही हा निधी उभारणे कसोटीच ठरणार आहे. जगात कोरोनाच्या महामारीत सगळय़ाच देशातील माणसे घाबरली आहेत. कारण या साथीचे आपणही बळी ठरू शकतो, असे प्रत्येकाला भास होत आहेत. यातून लॉकडाऊनमुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात हे दोन्ही प्रश्न माणसाला आदिम काळापासून सतावत आहेतच. या दोन्ही प्रश्नांसाठी माणूस आजवर धर्म आणि राजकारणाचा आधार घेत आला आहे. मात्र, मानवनिर्मित व्यवस्था या साथीमुळे पूर्णपणे उघडी पडली आहे, धर्म तोंडावरच आपटला आहे, तर राजकारण तोंड बंद करून बुक्क्यांचा मार खातो आहे. माणूस विवेकापासून दूर गेला, की त्याला एक तर प्रश्न पडतात किंवा त्याला प्रश्नांपासून दूर तरी जावे लागते. त्यामुळेच ही साथ म्हणजे विवेकवाद्यांसाठी हा संपूर्ण कालावधी एक नवी संधी आहे का? अर्थात ती विवेकवाद्यांसाठी संधी तर असेलच परंतु त्याचबरोबर विवेकापासून दूर जाऊन आपली विज्ञाननिष्ठा गमावलेल्या समाजाला विवेकाशीच आपली बांधीलकी घट्ट करावी लागणार आहे.
Previous Articleचिं. त्र्यं. खानोलकर : एक आगळा कादंबरीकार
Next Article ऍमेझॉन फ्लिपकार्टला अस्तित्व टिकविण्याची धास्ती
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.