ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्र सरकारने राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले असताना महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक आहे. यामुळे ई-पासची अट हटवण्याची मागणी करण्यात येत होती. पण महाराष्ट्र राज्य सरकारने ई-पास कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
अनिल देशमुख आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ‘मिशन बीगिन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मागर्दशक सूचना यापुढेही कायम राहतील.
म्हणजेच खासगी वाहनांना यापुढेही राज्यात वाहतुकीसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत खासगी वाहनांना ई-पास बंधनकारक असेल, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.