ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, रायगड, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात दरडी कोसळणे, भूस्खलन यासारख्या घटनांमध्ये 112 लोकांचा बळी गेला आहे. 99 लोक अजूनही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. तर राज्यातील 1 लाख 35 हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी सायंकाळी दरड कोसळून 32 घरे गाडली गेली. यात 49 जणांचा मृत्यू झाला असून, अद्याप 36 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भिती व्यक्त होत असून त्यांचा शोध सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या 12 घटना घडल्या आहेत. त्यामधील 18 जणांचे मृतदेह शनिवारी बाहेर काढण्यात आले. तर 22 जण अद्याप बेपत्ता आहेत. खेडमध्येही दरड कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.