ऑनलाईन टीम / मुंबई :
एकीकडे कोरोना संकटाचा सामना करावा लागत असतानाच महाराष्ट्रात सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पुन्हा मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तर मुंबई हे भूकंपाचे केंद्र आहे. आज पहाटे 3 वाजून 57 मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
मुंबईत पहाटे भूकंप जाणवल्यानंतर आज सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी नाशिकमध्ये देखील भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टल स्केल एवढी होती. यामध्ये कोणतीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.