मुंबई: प्रतिनिधी
राज्य सरकारने गुरुवारी मोटार वाहन (सुधारणा) कायद्यांतर्गत अधिसूचना जारी केली असून यामध्ये वाहतूक गुन्ह्यांसाठी सुधारित चक्रवाढ दंडाची तरतूद करण्यात आली आहे. अधिका-यांनी सांगितले की, बहुतेक वाढीव दंड “रस्ते सुरक्षा”शी संबंधित असून मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने आणि वाहकांना चांगली शिस्त लावण्याच्या उद्देशाने आहेत. “वैयक्तिक सुरक्षेशी” संबंधित हेल्मेट किंवा सीटबेल्ट न घातल्याबद्दलचा दंड 500 आणि 200 रुपयांवर कायम आहे. हेल्मेट न घातल्यास 3 महिने बाईकस्वार परवाना धारण करण्यास अपात्र ठरू शकतो अधिसूचना म्हणते.
वेगात गाडी चालवल्याचा दंड 1,000 रुपयांवरून 2,000 रुपये करण्यात आला आहे. बेकायदा पार्किंग हा गंभीर प्रश्न, असून यासाठी दंड 500 रुपयांपर्यंत वाढवला आहे. वेगवान वाहनांसाठी वाढ शुल्क 4,000 रुपये करण्यात आले असून धोकादायक ड्रायव्हिंगसंदर्भात, दुचाकीसाठी 1,000 रुपये आणि कारसाठी 2,000 रुपये दंड आहे. हा गुन्हा दुसर्यांदा केला तर गुन्हा तीन वर्षांच्या आत किंवा त्यापूर्वीच्या कार्यालयात केला असल्यास ते 10,000 रुपये इतके जास्त आहे. अधिसूचनेत म्हटले आहे.
परवाना नसलेल्या अल्पवयीन ड्रायव्हरसाठी, वाहनाच्या मालकाला, त्याच्या पालकांना किंवा कोणत्याही व्यक्तीला 5,000 रुपये दंड आकारला जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. यामध्ये 500 रुपयांवरून वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दुचाकीवरील ट्रिपल सीटसाठी, दंड 200 रुपयांवरून 1,000 रुपयांपर्यंत वाढविला गेला असून स्वारांना 3 महिन्यांसाठी परवाना धारण करण्यास अपात्र केले जाईल. राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, मुंबईत पार्किंग ही एक गंभीर समस्या आहे, आणि बेकायदेशीर पार्किंगसाठीचा दंड २०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या अधिसूचनेमध्ये ध्वनी आणि वायू प्रदूषणाचाही सामावेश केला आहे, ज्याचा दंड ५०० रुपयांवरून 1,000 पर्यंत वाढवला आहे.