सातारा येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी गादी गटातून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील हा पात्र ठरला असून, मुंबईचा विशाल बनकर हा अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज सायंकाळी या दोन मल्लांची लढत होणार असून, तमाम कुस्ती शौकिनांच्या नजरा या लढतीकडे लागल्या आहेत.
माती गटात मुंबईच्या विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखवर निर्णायक फेरीत मात करून महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी गाठली. तर गादी गटात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील पुढे पुण्याच्या हर्षद कोकाटेची मात्रा चाललीच नाही. गादी आणि माती गटातील अंतिम फेरीच्या लढतीत पुन्हा एकदा नव्या दमाच्या मल्लांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.