जिल्हाधिकाऱयांना शेतकऱयांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मागील वर्षांच्या गळीत हंगामाची बिले अद्याप देण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शिवसागर साखर कारखान्याने कोटय़वधीची बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून तातडीने ही बिले द्यावीत, या मागणीसाठी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
यावषीचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र मागील वर्षाची काही साखर कारखान्यांनी ऊस बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तातडीने ही ऊस बिले देण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी संबंधित साखर कारखान्यांना सूचना करावी, अशी मागणी शेतकऱयांनी यावेळी केली आहे.
शिवसागर साखर कारखान्याचे मालक राजेंद्र पाटील यांनी शेतकऱयांची दिशाभूल केली आहे. जवळपास 11 कोटी रुपये ऊस बिले दिली नाहीत. याचबरोबर शेअर्स रक्कमचाही मोबदला दिला गेला नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा तातडीने ऊस बिले द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, रवी सिद्दमण्णावर, जगदीश देवरड्डी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.